Posts

Showing posts with the label किल्ले रायगड

शिवराज्याभिषेक

Image
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे. कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते, रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होत...

महाराजांचे महानिर्वाण

Image
राजीयांचे देहवसान झाले ते दिवशी पृथ्विकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून जाला. रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभूमहादेवी तळ्यांचे उदक रक्तांबर जाले. पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहले.माझ्या राजाच्या जाण्याने हा तर केवळ सृष्टवर झालेला परिणाम काय अवस्था झाली असेल गडकऱ्यांची.आप्तइष्ठांची रायगड पूर्ण काळवंडला होता, गगनाला भिडलेले टकमक टोक आज ठेंगणे दिसू लागले होते.तेजस्वी सूर्याचा प्रकाश देखील आज मंद झाला होता. वरंधा घाटाच्या पलीकडून उंच आकाशात मान असलेला राजगड जणू तिथूनच राजेंचे अंतिम दर्शन घेत होता तो राजगड ज्याने पाहिले महाराजांचे तरुणपण, ज्याने पाहिले महाराजांचे जाणतेपण, करतेपण ते शौर्य तो पराक्रम ते धाडस ते अतिउच्च साहस वयाची २५ वर्षे आपल्या डोक्यावर महाराजांचा असणारा हात. राजाराम महारजांचा जन्म, सईबाईंचे निधन, तो त्या कित्येक वादळे धैर्याने सहन करणारा त्या राजगडाचा आज धीर खचला त्याच्या तिन्ही माच्या राजंना शेवटचा मुजरा करत होत्या,बालेकील्ल्याने टाहो फोडला होता २५ वर्ष माझ्या डोक्यावरचा मुकुट असणारा माझा राजा आज मला स...