Posts

Showing posts with the label राज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Image
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे. कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते, रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होत...

राजांची सुवर्णतुला २९ मे १६७४

Image
राजांच्या तुलादान विधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूचा पाय पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट ओंजळी-ओंजळींनी तबकातील झळझळीत सुवर्णमुद्रा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भोसालाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले. रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. "य उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये! " असे त्यांना वाटत होते. राजांनी विरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले. राजांची सुवर्णतुला झाली. मंत्राचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलाल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टानी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आखणी पंधरा तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या थोरल्या राजांची तुला झाली आता वेळ होती ती धाकल्या धन्याची. गागाभट्टाने दिलेली फुलं तुलेवर वाहून वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात टाकून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले सोनमोहरांच्या ओंजळी डाव्या पारड्यात पडू लागल्या. खणखणत पारड्यात उतरणाऱ...