Posts

ऑपरेशन ट्रायडंटल

Image
रोजच्या पोटापाण्याची भ्रांत असणाऱ्यांना कसले आलय कुठल्या गोष्टीचं सोयरं सुतक, रोजचा गाडा ओढण्यातच नशिबाला घामाच्या धारा लागतात. पण आजचा प्रसंग काहीसा वेगळा होता. साऱ्या दिल्लीमध्ये सायरन मोठमोठ्यान खणखणत होते. रस्त्यावरून पोलीस व्हॅन सतत सूचना देत होत्या. घरातून बाहेर उजेड येणार नाही एवढ्या खबरदारीनं राहण्याचे ते सांगत होते. ३ डिसेंबर १९७१ ची ती रात्र. सबंध उत्तर भारतात आगपाखड करत पाकिस्तानी विमानं घोंगावत होती. अंबाला, श्रीनगर, अवंतपूर, पठाणकोट, उत्तरलाईन, जोधपुर पार आग्र्यापर्यंत ही विमानं आत शिरली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपले सर्व कार्यक्रम स्थगित सर्वत्र होणाऱ्या हल्ल्याची माहिती घेतली. देश कि धडकन असणाऱ्या नव्या दिल्लीत खलबतांना उत आला. इंदिरा बाईंनी तिन्ही दलांच्या सेनापतींना बोलावून घेतले. बराच खल झाला. शेवटी रात्री उशिरा बाईंनी फोन उचलला पलीकडल्या "येस मॅमला" अलीकडून "संसार" एवढेच उत्तर दिले गेले. आता सुरवात झाली होती ती एक, भविष्यासाठी दैदिप्यमान ठरणाऱ्या ऐतिहासिक घटनेला.  # ऑपरेशन_ट्रायडंटला  सुरुवात झाली. भारतीय नौकांचा काफिला कराचीच्य

अपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब

Image
 भाऊबंदकी आम्हाला कधी सुटली नाही, आणि या गोष्टीला इतिहास देखील आहे, ही गोष्ट वेगळी, पण तरीही स्वातंत्रतेचा बाणा मनाशी बाळगून असणाऱ्यांनी कधीही या गोष्टीचा तसूभरही आपल्या ध्येयावर प्रभाव पडून दिला नाही ही देखील महत्वाची बाब. कंपनी सरकारची कोल्हापूर राज्याच्या कारभारातील अवाजवजी  लुडबुड आता सहन होण्यासारखी नव्हती, पण पर्याय नव्हता, आपल्या बंधूचे कंपनी सरकारकडे कललेले मत चिमासाहेबांना डाचत असे आणि या गोष्टी त्यांनी उघड उघड बोलूनही दाखवल्या होत्या. त्यामुळे दोन भावंडांमध्ये असणाऱ्या या वैचारिक भिन्नातेतून ते दोन्ही ध्रुव एकमेकांपासून दुरावू लागले. चिमासाहेबांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आवाजावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, पण "हातावर तुरी देणे" हा वाक्प्रचारचं जणू या घराण्याने मराठी भाषेला दिला असावा अशीच करामत घडत असत. इंग्रजी रेसिडेंटला - त्यांच्या बंधूंना अपयश येत असे. हे वारे  काहीतरी वेगळ्या दिशेने वाहणारे आहे,या गोष्टीची मात्र त्यांना निश्चित कल्पना आली होती. चिमासाहेब शूर, सशक्त, व  देखणे, त्यात त्यांना जात्याचा शिकारीचा नाद, भालाफेक देखील

इतिहासकर्ते

Image
या देशात फार कमी ठिकाणं अशी आहेत जिथे मराठयांचं रक्त सांडले नाही मग ते १६ व्या शतकातील मराठे असोत वा इंग्रजांच्या जुलमी राजवटीतील क्रांतिकारक असोत वा आजच्या घडीला देखील देशाच्या रक्षणासाठी खडे ठाकलेले आमचे जवान असोत एकप्रकारे या मुलखाची, देशाची रक्षण करण्याची जवाबदारी हि मराठ्यांवरचं येऊन पडलेली. अखंड लढत-झुंजत राहणाऱ्या मराठ्यांच्या तलवारीचे खणखणीत आवाज पार दिल्लीश्वराच्या कानी आदळले आणि ज्या तख्ताविरुद्ध मराठे लढत होते त्याचं तख्ताच्या रक्षणासाठीची जवाबदारी यांच्या खांद्यावर येऊन पडली. हा काळ होता १७६४ सर्वत्र धुमाकूळ, सत्ता गाजवत मराठे सारा हिंदोस्ता हाकत होते. गुजरातचा विचार करता, गुजरातच्या राजकीय सत्ता या सतत बदली होत राहिल्या, तसेच एकाच वेळेस मराठे, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींच्या सत्ता होत्या. मराठ्यांमध्येही पेशवे, गायकवाड, शिंदे इत्यादींची सत्ता गुजरातवर होते. तसेच काही भाग हा स्वतंत्र संस्थानिकांकडे होता. यापैकी काही संस्थाने मांडलिक तर काही स्वतंत्र होती, त्यामुळे राजकीय परिस्थिती थोडी अस्थिर व कायम लढाई राहिली, अशावेळी कायमस्वरुपी सैन्य, तोफखाना इत्यादींची गरज गुजरात

उंबरखिंड

Image
शास्ताखान पुण्यात ठाण मांडून बसला याच काळात आजूबाजूच्या परिसरात हातपाय पसरण्याचा त्याचा मनसुबा तडीस नेण्याच्या उद्देशाने त्याने सुरवात केली. विश्वासू सरदारांना एकांतात भेटून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे हा भाग हस्तगत करण्याची कामगिरी सोपविली गेली. कारतालाबखानसोबत कछ्प, चव्हाण, अमरसिंह, सर्जेराव गाढे, कोकाटे, जाधवराव यांची या मोहीमी साठी नियुक्ती केली गेली. विशेष म्हणजे यात या सरदारांशिवाय माहुरची रायबाघनदेखील या मोहिमेत सामील होणार होती. बरेच मोठे सैन्य घेऊन कारतालाब खान लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने पुढे सरकू लागला. वाट मोठी बिकट निरुंद गहन अरण्य ओलांडून पुन्हा सह्याद्रीची बिकट चढण चढून उतरायची व मग उंबरखिंडीतून खाली उतरायचे होते. इकडे कारतलबखानाच्या सर्व बातम्या महाराजांपातूर पोचतच हुत्या. राजांनी उंबरखिंडीच्या झाडीत सैन्य दाबून ठेवले. मोठी चढण चढून उतरून खानाचे सैन्य खिंडीत उतरले आणि रणभेरी निनादू लागल्या शत्रूने घेरल्याचे एव्हाना खानास समजले होते. बाणांचा बंदुकांचा मारा परस्परांवर होऊ लागला. प्रारंभी अमरसिंहाने व मित्रसेनाने मराठ्यांना चांगलेच तोंड दिले. रानोरान पळत

वांदीवॉशला मुघलांची दाणादान

Image
जिंजीपासून वांदीवॉश हे ठिकाण २५ मैल येथे मोगलांची अन्नधान्य सामग्री. ती आणण्याचा झुल्फिकारखानाचा प्रयत्न चालू होता. दोन अयशस्वी प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झला. मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती कि उपाशी सैनिकांनी रात्री तांड्यावर हल्ला करून ते लुटले. या हल्ल्यातून वाचलेले सैन्य घेऊन तो वांदीवॉशहून तळाकडे निघाला मार्गात देसुर या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी आपल्या २० हजार सैन्यासह त्याचावर हल्ला चढविला तो दिवस ५ जानेवारी १६९३ इतिहासकार भीमसेन सक्सेना यावेळी हजर होता त्याने लिहलेला प्रसंगातून हे कळते कि जुल्फिकार खान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले चढविले, मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. मोगली सैन्याची अशीकाही दाणादाण उडाली होती कि तिथे असणार्या भाताच्या शेतीत मोगली उंट, बैलगाड्या, हत्ती रुतून बसले चिखलातून मार्ग काढत उरल्यासुरल्या सैन्याने जीव वाचवून पळ काढला

छत्रपती राजाराम महाराज भोसले द्वितीय

Image
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात देशात, महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या परंतु इंग्रज अधिपत्याखाली असणाऱ्या जनतेमध्ये असणारा असंतोष आणि स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड यामध्ये काही गोष्टी, काही व्यक्ती, काही इतिहास हा समाजापुढे आलाच नाही. आणि त्यामुळे आज एकविसाव्या शतकात जगताना पुराव्याअभावी अशा घटना, वास्तू वा व्यक्ती यांविषयी जास्त काही माहिती मिळतचं नाही. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणायला गेले तर छत्रपती राजाराम महाराज द्वितीय. लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव. ३१ जुलै १८९७ च्या हा द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस, वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाड

राणोजी शिंदे

Image
१७२७-२८ पासून राणोजी शिंदेचा कार्यकाळ सुरु होतो. माळवा प्रांतातून, चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक होती. माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला त्यात उदाजी पवार, मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे देखील आपल्या पथकासोबत उपस्थित होते. १७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले. जुलै १७३६ च्या दरम्यान महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे राणोजी शिंदे यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व विशेष खुलून दिसते. असे हे राणोजी शिंदे १७३५ ते १७४५ मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत सतत आघाडीवरचं होते. जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवरुन चाललेल्या वारसाहक्कात राणोजी शिंदे यांना ईश्वरसिंहाने विशेष पत्र लिहून मदतीस बोलाविले यावरून त्यांचे त्याकाळचा दरारा देखील लक्षात येतो. या केलेल्या मदतीखातर ६६ लाख रुपये राणोजी शिंदेंना मिळाले छत्रपती शाहू राजांच्या पदरी असणाऱ्या अशा या रणमर्द सेनानायकाचा १९ जुलै १७४५ रोजी