सेवेस तत्पर हिरोजी इंदलकर


माणसे कोणत्या मोहाने महाराजांकडे आली. विश्वास दिला होता महाराजांनी आपले राज्य उभा करायचं, मला सिहासनावर बसायचय म्हणून राज्य निर्माण करायचे नाही तर संबंध मराठ्यांचे राज्य निर्माण झाले पाहिजे हि काळजी इथल्या माणसामाणसांत होती .याच मोहाने अनेक माणसे महाराजांकडे आली ज्यांची राजांप्रती निष्ठा होती त्यातील एक हिरोजी इंदलकर
हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख महाराजांकडे होता रायगड सारखा किल्ला बांधण्याची जवाबदारी शिवाजींनी त्याच्यावर सोपवली
शिवाजी स्वारीवर गेले. हिरोजीने किल्ला निम्या पर्यंत बांधत आणला.आणि पैसा संपला हिरोजीला कळेना काय करावं शिवाजिंने जवाबदारी तर टाकलीये किल्ला तर बांधला पाहिजे पैसा तर शिल्लक नाही
ह्या हिरोजीने अपूर्व काम केले आपला राहता वाडा आपली सगळी जमीन विकली बायकोला घेऊन रायगडला आला पैशासह झोपडी बांधून राहिला लागला
आणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली .शिवाजींना आल्यावर कळलं हिरोजीने काय केले ते राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजींना वाटलं ह्या हिरोजीचा सत्कार करावा.
राज्याभिषेकाच्यावेळी शिवजी म्हणाले हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात बोला तुम्हाला काय हवयं
त्यावेळी हिरोजी मान झुकवून म्हणाला महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरांत टाकलाय आम्हाला आणिखी काय हवयं महाराज म्हणाले नाही हिरोजी तुम्ही काही तरी मागितलेच पाहिजे त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे या रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधलय त्या मंदिराच्या एका पायरीवर आमचे नाव कोरण्याची अनुमती हवी आहे
महाराजांना कळेना हे कसले मागणे पाचवा वेतन आयोग नाही मागितला ,पगारवाढ नाही मागितली ,पाटीलकी नाही मागितली देशमुखी नाही मागितली मागून मागितले तर काय दगडावर नाव कोरण्याची अनुमती महाराजांनी विचारले हिरोजी असे का
आणि हिरोजी यावर सांगतायत राजे जेव्हा रायगडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल जेव्हा जेव्हा दर्शनाला याल तेव्हा तुमची पाउले त्या पायर्यांवर पडतील आणि महाराज त्यातल्याच एका पायरीवर जर माझे नाव असेल तर तुमची पायधूळ सतत माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील एवढे भाग्य फक्त पदरात टाका कि तुमच्या पाउलांची पायधूळ सतत माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहू देत

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब