जंजिरा



जंजिरा



किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
डोंगररांगः रायगड
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किना-यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते. ही भटकंती चालू होते रेवस बंदरापासून तर संपते तेरेखोल पर्यंत. नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.
इतिहास : जंजिरा किल्ल्यालाच 'किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा' अशी नावे होती. इ. स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयिन मुलगा बु-हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्याचवेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत.म्हणून त्यांनी राजपुरीच्या खाडीवर लाकडी मेढेकोट उभारला. रामपाटील या कोळ्याचा अमल त्यावेळी त्यासर्व परिसरावर होता. निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशाहा कडे पाठवून त्याचे धर्मांतर केले .इ.स.१५२६ ते १३३२ च्या कारकिर्दीनंतर .इ.स.१५३२ मध्ये पिरामखान मरण पावला बु-हाण निजामशहाची नेमणूक केली. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट 'किल्ले मेहरुब' नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १८५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमाणुक झाली.


१६१२ मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली ,याच्या मृत्यूनंतर १६१८ - १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थपन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला. इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला. जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिध्दी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षेराज्य केले आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघाराज्यात विलीन
झाले. इ.स १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला.



१६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तरकोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण,हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार ,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिस-या स्वारीचे वर्णन सभासद बखरीत खालीलप्रमाणे दिलेले आहे. '' राजियांनी व्यंकोजी दत्तो फौजेनिशी नामजाद रवाना केले. त्यांनी जाऊन मुलूख मारून तलफ केला. मग शिद्दीने आपले जातीचे हापशी लष्कर घोडेस्वार व हशम नामजाद व्यंकोजी दत्तोवर रवाना केले. त्याशी युद्ध झाले. तीनशे हबशी व्यंकोजीपंत मारिले.घोडे पाडाव केले.


व्यंकोजीपंत कस्त फार केली. बारा जखमा व्यंकोजीपंतास लागल्या असा चौका बसून आले. शिद्दीने सल्याचे नाते लावले. पण राजियांनी सला केलाच नाही.'' ही जंजि-यावरील तिसरी स्वारी होती. १६७८ च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजि-यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय
संस्थानात विलीन झाले.






गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : राजापुरी गावापासून येणारी होडी जंजिरा किल्ल्याच्या पायथ्यापाशी थांबते. प्रवेशद्वारावरील पांढ-या दगडातील पारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर विशिष्ट प्रकारचे दगडात कोरलेले शिल्प आढळते. हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते. दोन दरवाजांच्या मध्ये पहारेक-यांच्या देवडा आहेत.जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणा-या पाय-यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत, त्यापैकी सर्वात
मोठा तोफेचे नाव 'कलाडबांगडी ' असे आहे.पीरपंचायतन : किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. यालाच पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत ५ पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणातच काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.घोडाच्या पागा : पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोडाच्या पागा लागतात.सुरुलखानाचा वाडा : येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी भक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. अनेक वर्षात या वाडाची मोठा प्रमाणावर पडझड झालेली आहे.तलाव : या वाडाच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्कोनी गोडापाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मी व्यासाचा आहे. चार कोप-यात चार हौद आहेत.सदर : बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगधी इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात.बालेकिल्ला : तलावाच्या बाजूने बांधीव पाय-यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे.पश्चिम दरवाजा : गडाच्या पश्चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्याला स्वतंत्र असे २२ बुरुज आहेत. आजही ते सुस्थित आहेत. सर्व किल्ला पाहण्यास तीन तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
१.अलिबागमार्गेः जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर पुणे मुंबई मार्गेअलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गेमुरुड गाठता येते. मुरुड
गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किना-या पासून किल्ला गाठण्यास अर्धा तास पुरतो.

२. पाली- रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव मार्गेः अलिबाग मार्गेन जाता पाली- रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव मार्गेमुरुडला जाता
येते.
३.दिघीमार्गेः कोकणातून यावयाचे झाल्यास महाड - गोरेगाव - म्हसळे - बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा
उपलब्ध आहे.

राहण्याची सोय : मुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते.जेवणाची सोय : गावात जेवणाची सोय होते.पाण्याची सोय : किल्ल्यावर नाहीजाण्यासाठी लागणारा वेळ : मुरुड गावापासून अर्धा तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब