वर्धनगड


वर्धनगड


किल्ल्याची उंची : १५०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः सातारा - फलटण
जिल्हा : सातारा
श्रेणी : सोपी

वर्धनगड हा किल्ला सातराच्या महादेव डोंगर रांगेवरील भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर कोरगावच्या ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर बांधलेला आहे.किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्र्वर ह्या
दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.
इतिहास सन ५ में ७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य साता-यातील किल्ल्यांकडे वळवले.मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की '' बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील.'' औंरगजेबाने मंजुरी दिली .दि ८ जून ला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला.त्याने खटावचे ठाणे जिंकले.मराठांचा पराभाव झाला.यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा हाऊ लागली होती.आज न उा हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून वर्धनगडातील मराठांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडांतील लोकांना आक्रमणाची अगाऊ कल्पना दिली होती.ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायकामुलाना किल्ल्यात नेले.नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला .त्याने याला सांगितले की ''किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला दण्यास तयार आहे.''फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केले. फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता.किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उा येईल म्हणून वाट पहात राहीला पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुध्दा नाही.फतेउल्लाखानाला मराठयाचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला.त्याला मराठांनी चोख प्रत्युत्तर दिले.पण यात अनेक मराठे मारले गेले अनेकजण जखमी झाले.मोगलानी मराठांच्या चाळीस लोंकाना कैद केले.मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या.या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले.दि.१९जूनला रात्री मराठांनी वर्धनगड सोडला.दि.२२ जन रोजी 'मीर ए सामान ' या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला.त्याने किल्ल्यातून
सहाशे पंचाहत्तर मण धान्य , चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू ,सहा मोठा तोफा व जंबुरक असा माल जप्त केला.त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून 'सादिकगड' असे ठेवले. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे.आजही ते सुस्थिति उभे आहे.दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते तर ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुस-या टोकाशी येऊन पोहचते. ही तटबंदी आजही चांगल्या स्थितित शाबूत आहे.दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे.या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे.
दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक माठे टेकाड दिसते.यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पाय-या आहेत.या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्र दगडी मूर्ती आहे.पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते.त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणा-या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी १५ मिनिटे पुरतात.टेकाडावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे आहे.मंदिर जीर्णोध्दारीत असल्यामुळे सध्या रंगरंगोटी केल्यामुळे आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे.मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते.मंदिराच्या गाभा-यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरते.यावाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात. संपूर्ण गड फिरण्यास एक तास पुरतो.



गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण किंवा सातारा या दोन्ही बाजूंनी रस्ते
आहेत. वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्क्कम तटबंदी दिसते.आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.पायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे.ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचवते.या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो.वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठा डौलाने उभ्या आहेत.
१. फलटणमार्गे
फलटणमार्गेवर्धनगड गावात दोन मार्गांनी पोहचता येते.
१ - फलटण - मोळघाट - पुसेगाव गाठावे.यामार्गेपुसेगाव गाव फलटण पासून ४१
कि.मी वर आहे.
२ - फलटण - दहिवडी मार्गेपुसेगाव गाठावे यामार्गेपुसेगाव गाव फलटण पासून
४५ कि.मी वर आहे.

पुसेगावापासून साता-याकडे जाणा-या रस्त्यावर ५ कि.मी अंतरावर वर्धनगड गाव फाटा आहे. वर्धनगडगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.फलटण ते पुसेगाव अशी एस टी सेवा उपलब्ध आहे.
२. सातारामार्गे सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या अलिकडे ५ कि.मी वर वर्धनगड गावाचा फाटा आहे.सातारा पुसेगाव अशी एस टी सेवा उपलब्ध आहे.


राहण्याची सोय : गडावरील वर्धनीमातेचे मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.
पाण्याची सोय : बारमाही पिण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : अर्धा तास

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६