अलंग


अलंग



किल्ल्याची उंची : ४५०० फूट.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः कळसूबाई
जिल्हा : नाशिक
श्रेणी : अत्यंत अवघड

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण अशा किल्ल्यांची ही भटकंती. घोटीवरून भंडारद-याला जातांना कळसूबाई
शिख्रराच्या रांगेत अलंग,मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील
भटकंती तशी त्रासदायकच आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची
११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर
दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंढचा किल्ला,पट्टा ,बितनगड,उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड,अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड,आजोबाचा गड,
खुट्टा सुळका ,रतनगड,कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
आंबेवाडी माग : अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा - घोटी -पिंपळनेरमोर या मार्गेआंबेवाडी

गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ कि.मी चे अंतर आहे. घोटीवरुन
पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे.
आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन च्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट
आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा
मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. अ.) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण
खालच्या पठारावर पोहचतो. येथून अलंग चा कडा डावी कडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणा-या तीस-या घळी पाशी पोहचतो.
या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी

लागते.येथून डावीकडे कडालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत
पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात. ब.) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही
पाय-या लागतात. या पाय-या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कडावर प्रस्तरारोहणाचे
साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्या शिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. यावाटेने
किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
घाटघर मार्गेः किल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे.घोटी - भंडारदरा मार्गेघाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात

किल्ल्याच्या तीस-या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो.
उदडवणे गावातून : किल्ल्यावर जाण्यासाठी आणखी एक वाट आहे. ती भंडारदरा मार्गेउदडवणे गावातून पठारावर येते. पुढे क्रं २ च्या
वाटेला येऊन मिळते.

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत.यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय : आपण स्वतःच करावी.पाण्याची सोय : बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.जाण्यासाठी लागणारा वेळ : आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.सूचना : किल्ल्यावर जाण्याच्या वाटा अवघड असल्यामुळे प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६