अंजनेरी
किल्ल्याची उंची : ४२०० फूट.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः त्र्यंबकेश्र्वर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : सोपी
अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. नाशिक त्र्यंबकेश्र्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्र्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि. मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायर्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बर्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहे.समोर असणार्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसर्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही. गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जातेनाशिक त्र्यंबकेश्र्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि. मी. अंतरावरील अंजनेरी फाटायावर उतरावे. या फाटापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे. गावातून नवरा- नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायर्या लागतात. पायर्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो. राहण्याची सोय : १. पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.
२. सीता गुंफेत सुद्धा १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय : आपण करावी.पाण्याची सोय : मंदिराजवळच बारामाही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : अंजनेरी गावातून २ तास.
Comments
Post a Comment