अवचितगड



अवचितगड



किल्ल्याची उंची : ३०० मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः रोहा
जिल्हा : कर्जत
श्रेणी : सोपी

दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी. भरते. घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर फारसे पाहण्यासारखे काही नाही. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍या दरवाजात पाण्याने तुडुंब भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे,माकड,बिबळ्या,कोल्हे इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती ,सुधागड,सरसगड,धनगड,कोरीगड,रायगड,सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो.
गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१. पिंगळसई माग : अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून पायी दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते.
२.मेढा माग : मुंबई-रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ कि.मी. असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोर्‍यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.
३. पडम माग : गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गेपिंगळसई गावाला येतांना रोहा नागोठणे मार्गावर एक बंद
पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वरापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.जेवणाची सोय : जेवण आपण स्वतः घेवून जावे.पाण्याची सोय : गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : पिंगळसई मार्गे१ तास तर पडम मार्गे२ तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६