किल्ले इरशाळगड



इरशाळ गड




किल्ल्याची उंची : ३७०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः माथेरान
जिल्हा : ठाणे
श्रेणी : अत्यंत कठीण

इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व. कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे. पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठा प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.


इतिहास : तसे म्हटले तर या इरशाळला गड म्हणणेच अयोग्य आहे कारण इरशाळ हा एक सुळकाच आहे. त्यामुळे इतिहासातही त्याचा फार असा कुठे उल्लेख नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी - रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठांच्या ताब्यात आला असावा. इरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वेयाचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई - ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जातांना, वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत. तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढात पोहोचतो. नेढापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे. नेढातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी,मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.

राहण्याची सोय :नाही
जेवणाची सोय:इरशाळवाडीत ५ ते ६ जणांची होऊ शकते.
पाण्याची सोय : मार्च पर्यंत गडावरील टाक्यात पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : इरशाळवाडीतून एक तास.
सूचना : अतिकठीण (गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे). १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६