किल्ले पन्हाळगड




किल्ल्याची उंची : ४०४० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः कोल्हापूर
जिल्हा : कोल्हापूर
श्रेणी : सोपी

महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांना अनन्या साधारण महत्व आहे.त्यांच्या कारकिर्दीतील खरे सोबती म्हणजे अजिंक्य आणि बेलाग किल्ले.शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळगड.

इतिहास : हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.याचे पहिले नाव 'पन्नग्रालय' .अफजलवधानंर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८-११-१६५९ ला घेतला.किल्ला विजापुररांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.२ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला.पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ ध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
१. राजवाडा
हा ताराबाईचा वाडा होय.वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बाईज होस्टेल आहे.
२. सज्जाकोठी
राजवाडावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते.याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यास ठेवले होते.शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.
३. राजदिंडी
ही दुर्गम वाट गडाखाली उतरते.याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढातून निसटले.हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
४. अंबारखाना
अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत.यात वरी,नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे.याशिवाय सरकारी कचे-या ,दारुगोळा अणि टाकंसळ वैगरे होती.
५. चार दरवाजा
हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय.इ.स १८४४ मध्ये हा इंग्रांनी पाडून टाकला.थोडे भग्रावशेष आज शिल्लक आहेत.येथेच 'शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.
६. सोमाळे तलाव
गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.तळ्याच्या काठावर सोमेश्र्वर मंदिर आहे.ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
७. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी
सोमेश्र्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात.त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
८. रेडे महाल
याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
९.
संभाजी मंदिर
त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

१०. धर्मकोठी:
संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी .सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

११. अंदरबाव
तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते.ही वास्तू तीन मजली आहे.सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे ,तर मधला मजला रा पेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

१२. महालक्ष्मी मंदिर
राजवाडातून बाहेर पडल्यावर नेहरू उानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे.हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे .राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

१३. तीन दरवाजा
हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा .दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.

१४. बाजीप्रभुंचा पुतळा
एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

१. चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून 'एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते.ही वाट चार दरवाजा मार्गेगडात प्रवेश करते.

२. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो.हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी निवसस्थाने ,हॉटेल्स आहेत.

जेवणाची सोय : निवासस्थानांमध्ये होते.

पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास.

जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब