जीवधन


जीवधन



किल्ल्याची उंची : ३७५४
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः नाणेघाट
जिल्हा : पुणे
श्रेणी : कठीण


घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला 'जीवधन' किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटापासून अगदी सादेच्या अंतरावर आहे.

इतिहास : शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. पण याची साक्ष देणारा एकमेव किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज 'मूर्तिजा निजाम' याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणा-या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. येथील जमिनीचे वैशिष्ट म्हणजे बांबूची बने. सारे जंगल हे बांबूच्या बनांचे आहे.गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकडामध्ये कोरलेला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पश्चिम दरवाज्याने वर गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला 'कोठी' असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाईदेवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज-मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठडांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडाचा आकार आयताकृती आहे. वांदरलिंगीच्या कडापासून कोकणचे निसर्गरम्य दर्शन
होते. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्र्वराचे मंदिर, धसईचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात. अशाप्रकारे हा जीवधन किल्ला चार ते पाच तासांत पाहून होतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
१) कल्याण-नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात. हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते. तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पाय-या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे.

२) गडावरजाणारी दुसरी वाट जुन्नर-घाटघर मार्गेराजदरवाज्याची आहे. ही वाट घाटघरहून सरळ गडावर जाते. वाट अत्यंत सोपी आहे.



राहण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब