राजधेर





किल्ल्याची उंची : ३५५५ फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः -सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : कठीण

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते.पुढे तीच मनमाडच्या
जवळ असणा-या अंकाईच्या पर्यंत जाते.याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात.चांदवड तालुक्यात ४ किल्ले
येतात.राजधोर,कोळधेर,इंद्राई आणि चांदवड.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : राजधेर किल्ल्यावर प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक
फारसीतील शिलालेख आहे.येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पाय-या लागतात.गडमाथ्यावर पोहचल्यावर
समोरच दोन वाटा फुटतात एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी .आपण उजवीकडची वाट पकडायची , थोडे पुढे
गेल्यावर एक वाडा लागतो.आजही वाडा चांगल्या स्थितित उभा आहे.या वाडाशिवाय येथे बघण्सासारखे काही नाही.परत फिरून
आता डावीकडची वाट पकडायची .या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते.या गुहेत उतरण्यासाठी
एक शिडी लावलेली आहे.येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते.गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहीर
आहे.येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते.या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते.तलावाच्या
काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे.तलावाच्या कडेकडेने जाणा-या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहचतो.वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात.गडाच्या सर्वोध माथ्यावर एक तलावआहे.गडमाथ्यावरुन मांगीतुंगी, न्हावीगड ,कोळधेर ,इंद्राई,धोडप असा सर्व परिसर दिसतो.गडमाथा फिरण्यास २ तास पुरतात.उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे.येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते.गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे.येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते.या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते.तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे.तलावाच्या कडेकडेने जाणा-या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहचतो.वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात.गडाच्या सर्वोध माथ्यावर एक तलाव आहे.गडमाथ्यावरुन मांगी तुंगी ,न्हावीगड ,कोळधेर ,इंद्राई,धोडप असा सर्व परिसर दिसतो.गडमाथा फिरण्यास २ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
१. राजधेरवाडी मार्गे
राजधेरवर जाण्यासाठी एकच मार्ग आहे.नाशिक किंवा मनमाड मार्गेचांदवड गाठावे.नाशिक पासून चांदवड ६४ कि.मी वर आहे तर मनमाड पासून चांदवड २४ कि.मी वर आहे.चांदवड मधून एस टी ने राजधेरवाडी गाठावी.राजधेरवाडी हे पाययथ्याचे गाव आहे.राजधेरवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे.गावातून किल्ल्यावर जातांना आपण एका कातळकडापाशी पोहचतो.येथून वर जाण्याच्या पाय-या तुटलेल्या आहेत.पण सध्या तिथे एक शिडी लावली असल्यामुळे आपण गडाच्या प्रवेशद्वारात पोहचू शकतो.अन्यथा प्रवेशद्वारा पर्यंत पोहचण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते.राजधेरवाडीतून इथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : गावातून दीड तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६