औंढ



किल्ल्याची उंची : ४४०० फूट
डोंगररांगः कळसूबाई
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
श्रेणी : अत्यंत कठीण

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग
पडतात. एक म्हणजे अलंग,मदन,कुलंग आणि कळसूबाई तर पूर्वेकडील औंढ, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा
सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एस.टी. ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. किल्ल्यावरचा
भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर
आहे.

इतिहास : इ.स.१६८८ पर्यंत हा किल्ला मराठाच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झालीगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : औंढचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चार-पाच टाक्या आहे. एका गुहेत पाणी आहेखड्कात खोदलेला दरवाजा आहे. समोरच पट्टा किल्ला, बितनगड, अलंग,मदन आणि कुलंग, कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.गडावर जाण्याच्या वाटा : औंढा किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.निनावी मार्गेः मुंबई मार्गेइगतपुरी गाठावी. इगतपुरी बस स्थानका वरून सकाळी ७.०० वाजता भगूर कडे जाणारी एस.टी पकडून साधारणतः दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर साधारण नाक्या पासून ४५ मिनिटांत आपण निनावी गावात पोहचतो. निनावी गावातून औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिली वाट गावातून समोरच दिसणा-या उभ्या कडाच्या घळी मधून जाते. ही वाट मात्र मस्त दमछाक करणारी आहे. दुसरी वाट निनावी गावातील दुस-या हनुमान मंदिराजवळून जाते. ही वाट कमी दमछाक करणारी पण पहिल्या वाटेपेक्षा जास्त वेळ लावणारी आहे. यावाटेने किल्ल्याचे पहिले पठार गाठण्यास पाऊण तास लागतो. या पठारावरच औंढाकिल्ला ठेवल्या सारखा दिसतो. येथून किल्ल्याच्या पाय-या पर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो. समोरच कातळात कोरलेल्या पाय-या लागतात.
पाय-या चढून गेल्यावर कडा उजव ीकडे ठेवून पुढे जावे. वर थोडे प्रस्तरारोहण केल्यावर गडमाथा गाठता येतो.पट्टा किल्ला मार्गेः अनेक जण औंढ-पट्टा-बितनगड असा ट्रेक सुद्धा करतात. येथून पट्टा किल्ल्याला जाण्यासाठी वरील मार्गाने किल्ल्याच्या पाय-या असणा-या पठारावर परतावे. पठारावरून समोरच एक भगवाझेंडा फडकतांना दिसतो. येथून पुढे जाणारी वाट थे ट पट्टा किल्ल्यावर जाते.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, औंढावाडीत राहता येते.जेवणाची सोय : नाही.पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहेजाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास निनावी मार्गेआणि २ तास पट्टा किल्ला मार्गे.सूचना : पावसाळ्यात अतिकठिण

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६