माणिकगड






किल्ल्याची उंची : २५००
फूटकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः कर्जत पनवेल
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम

मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात.प्रबळगड,इरशाळ,चंदेरी,माथेरान,कर्नाळा,लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा,सांकशी,माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ.माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे.शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधन आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठा दिसतात.कोठांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पाय-या आहेत.येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात.त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात.येथून डावीकडे फुटणा-या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते.टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे.पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज आढळतात.येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.किल्ल्यावरूनप्रबळगड,इरशाळगड,कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो.संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा : पनवेल किंवा खोपोली मार्गेयायचे झाल्यास आपटे फाटामार्गेरसायनीकडे वळावे.रसायनीमधून वाशिवली गावात यावे.वाशिवली गावातून वडगाव गावात यावे.वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड तास पुरतो.वडगाव हे ब-यापैकी मोठे
गाव आहे.माणिकगडाची एक सोंड गावातच उतरलेली आहे.या सोडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवर चढत जावे.वडगाव पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो.या डोगराच्या माथ्याचर कातरवाडी वसलेली आहे.या वाडीतून गड समोरच दिसतो.गडाच्या दिशेने चालत निघायावर अर्ध्यातासातच आपण एका जंगलात शिरतो.येथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.
१. माणिकची लिंगी मार्गे उजवीकडे जाणारी वाट प्रशस्त आणि मळलेली आहे.या वाटेने जातांना गड डावीकडे ठेवून आपण पुढे जातो.वाट जंगलातून पुढे गेलेली आहे.सुमारे अर्ध्या तासाने आपण गडाच्या पश्चिम टोकावर पोहचतो.येथेच गडाला चिटकून एक सूळका आहे.यालाच 'माणिकची लिंगी' म्हणतात.येथून एक वाट सरळ पुढे
पठारावर गेलेली आहे तर दुसरी वाट डावीकडे जंगलात वर चढत गेलेली आहे.ही वाट किल्ला आणि सुळका यांच्या बेचक्यातून वर जाते.हीच वाट आपण पकडायची.या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते.या घळीतून वर चढून जायचे पण वाट जरा दमछाक करणारी आहे.या वाटेने किल्ल्यावर पोहचण्यास एक तास लागतो.
२. खिंडीतुन
उजवीकडच्या वाटेचा नाद सोडून ायचा आणि समोर असणा-या झाडीत शिरायचे.या वाटेने आपण समोरची डोंगरसोंड चढत जातो.पुढे दोन उंचवटे पार केले की आपण एका खिंडीत पोहचतो.येथेच एक छोटासा सुळका आहे. सुळका आणि डोंगर यांच्या खिंडीतून वर चढले की आपण पुन्हा एका घळीत पोहचतो.या घळीतून सोपे प्रस्तरारोहण करून वर चढले की आपण एका पठारावर येऊन पोहचतो आणि या पठारावर क्रं १ ची वाट आपल्या वाटेला येऊन मिळते.या दोन्ही वाटा एकत्र येऊन पुढे एक वाट तयार होते आणि आपण किल्ल्यात प्रवेश करतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे३ तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब