सुरतकरांच्या तोंडचे पाणी दुसऱ्यांदा पळवून. महाराज परतीच्या वाटेला लागले , मिळालेली लुट बैलांवर लादून महाराज मनोहरगडाकडे फिरले. महाराज गडावर परतले आणि कुरुटे बेटाकडून गोविंद विश्वनाथ प्रभूंनी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची वार्ता आणली.
सिंधुदुर्ग जंजिरा, जागी अस्मानी तारा जसे मंदिराचे मंडन, श्री तुळशी वृंदावनतैसा महाराजांच्या राज्याचे भूषणपरद आलंकार शिवलंका जंजिरा शिवाजी महाराजांचा.
आनंदित झालेले महाराज किल्ल्याची वास्तुशांत करण्यासाठी सिंधुदुर्गाकडे निघाले. सिधुदुर्गाची वास्तुशांत झाली तो शुभ दिन होता, श्रीनृपशालिवाहन शके १५८९ च्या प्लवंग नाम संवत्सराची चैत्र शुद्ध पोर्णिमा. शुक्रवार दि.२९ मार्च १६६७यावेळी महाराजांनी कामगारांना मुक्तहस्ते धन वाटले. जाल्दुर्गावर नव्या नेमणुका केल्या. दादंभट बिन पिलंभटास सिंधुदुर्गाचे उपाध्येपण मिळाले. सिंधुदुर्गाची हवालदारी रायाजी भोसल्याकडे सोपविली गेली. गोविंद विश्वनाथ प्रभूंनी प्राण ओतून सिंधुदुर्ग उभा केला होता.. मोत्याचा तुरा भेट देऊन महाराजांनी त्यांची पाठ थोपटली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामजी अनंत यांस लिहिलेले पत्र.
शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर तर होऊ नयेत, तर त्यास योग्य त्या सवलती देण्यात यावे म्हणून राजांचे हे पत्र यात राजांची जागरूकता दिसून येते हे पत्र होते ५ सप्टेंबर १६७६
येक भाजीच्या देठासही मन नको
अशी होती शिवशाही
कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती | रणी झेलतो सिंहासा छातीवरती || हाकारूनी आव्हानतो जो यमाला | मराठा म्हणावे अशा वाघराला || दिला एकदा शब्द न पालटावा | पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा || धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला | मराठा म्हणावे अशा वाघराला || आपत्तीतही पाय मागे फिरेना | महा संगरी धैर्य ज्याचे गळेना || मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला | मराठा म्हणावे अशा वाघराला || जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल | तिला साडीचोळीनिशी पाठवेल || कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला | मराठा म्हणावे अशा वाघराला || (लेखक - भिडे गुरुजी)( नेट साभार)
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे. कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते, रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होत...
Love your blog! Keep up the good work!
ReplyDeletehttp://www.w3idea.com