छत्रपतींचा सय्यम आणि सेनापतीचे झंजावात

संभाजी महाराज गेले आणि मराठा रियासतीवर शोककळाच पसरली औरंगजेबाचा हैदोस मात्र महाराष्ट्रावर अखंड चालूच होता, त्याला जणू असे वाटले होते. की आता मराठेशाही देखील आपण गिळंकृत करूच पण परिस्थितीवर रडण्या पेक्षा परिस्थितीशी लढण्यातच पुरुषार्थ आहे. ही शिकवण शिवाजी महाराज देऊन गेले होते तेच शिवसूत्र मानून अनेक संकटे पार करीत राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावरून स्वराज्याचा गाडा हाकू लागले. मोठ्या धैर्याने राजे हे कार्य बजावत होते.

त्याकाळी राजाराम राजेंची कर्नाटक मधील स्थिती किती बळकट झाली होती हे एका अस्सल मराठी पत्रावरून समजते. त्यात असे नमूद केले आहे की, छत्रपतींनी कर्नाटकात चाळीस हजार घोडदळ, एक लक्ष पंचवीस हजार पायदळ उभारले असून केसो त्रीमाल सोबत पंधरा हजार घोडदळ आणि पंचवीस हजार पायदळ आणि एक लाख होनाचा खजिना देऊन महाराष्ट्रात धाडले होते.
औरंगजेबाने तर मराठेशाही संपविण्याचा चंगच बांधला होता. रायगड विजेत्या जुल्फिकार खानास त्यांनी राजाराम महाराजांना पकडून आणण्यासाठी जिंजीस धाडले. ही खबर छत्रपतींना समजली तेव्हा जिंजीकडे येत असलेल्या संकटास थोपविण्यासाठी राजेंनी मराठी - नायकांची संयुक्त फौज खानावर धाडली. परंतू खानासमोर फौज सपशेल पराभव खाऊन माघारा आली. आणि खान विजयाच्या धुंदीत दुगण्या वेगाने जिंजीचा किल्ला घेण्यासाठी खडा ठाकला तो दिवस होता २७ ऑगस्ट १६९०. लवकरच उभयपक्षी लढाई सुरु झाली.

परंतू शिवरायांनी निर्माण केलेल्या एका दुधारी शास्त्राच्या बळावर (रसाळ आणि मधाळ जीभ) राजाराम महाराजांनी खानच्या छावणीत भेद निर्माण करून टाकला. मराठी राज्यावर पाखरे झालेल्या नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, व नागोजी माने या बड्या मराठी सरदारांच्या मनात. ते

स्वराज्यज्योती पेटवण्यास राजे यशस्वी झाले. परिणामी हे मराठा सरदार मोगली छावणी सोडून आपल्या लष्करासह जिंजीत राजेंकडे दाखल झाले (२३ नोव्हेंबर, १६९०) हा मोगलांना बसलेला जबरदस्त धक्का होता तरी खानाने वेढा चालूच ठेवला. तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला एक अजस्त्र किल्ला जिंकणे सोपी बाब नाही हे खान उमगला. आणि बादशहाच्या कानाला लागून त्याने वजीर आसदखान आणि व पुत्र शहजादा कामबक्ष यांच्या समवेत फौजफाटा पाठवून दिला. १६ डिसेंबर १६९१ ते छावणीत दाखल झाले देखील.

आता मोगलांचे बळ वाढले ते देखील अनेक पटीने. आणि भेद शक्य नव्हता आता अजगराचे विळखे जबर पडू लागले. लागले तेव्हा राजाराम महाराजांचे दोन वाघ शत्रू प्रदेशात धुमाकूळ घालत होते त्यातील एक वाघ निघाला जिंजीचा वेढा उठवायला शिवरायांचा अंकुर जपायला कोण होता तो वाघ? दस्तुरखुद्द शिवरायांच्या तालमीत तयार झालेले हे घोंगावतं मराठी वादळ म्हणजे सेनापती संताजी घोरपडे होय

संताजी जिंजीकडे दौडत असता त्यांना जिंजीच्या तळाला रसद घेऊन अलीमर्दाखान जात असल्याची बातमी त्यांना मिळाली प्रथमतःमोगली रसद कापण्याचे त्यांनी ठरविले. जशी शिवरायांच्या काळात पेडगाव लुट झाली होती तशीच चाल संताजी खेळले दोन हजार सैन्य घेऊन खानावर चालून गेले आणि त्वरित माघार घेतली. त्यामुळे अलीमर्दाखानास चेव चढला त्याचे सैन्य संताजींच्या मागे निघाले शत्रूला पाठीवर घेऊन संताजींनी त्यास
आपल्या मुख्य सैन्याच्या कचाट्यात आणून सोडले.

अचानक हल्ल्याने मोगल धास्तावले ते हरले अलीमर्दाखान मराठ्यांच्या हाती लागला, हत्ती, ३०० उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे आणि त्यांच्या पाठीवरची प्रचंड रसद मराठ्यांना लाभली.
या विजयामुळे तळावरील सैन्यास प्रचंड धक्काच बसला. शत्रू सैन्याने इतकी दहशत खाल्ली की. मोगली फौज आणि बादशाही छावणी या दरम्यान दळण वळण बंद पडली. स्वतः औरंगजेब परलोक वासी झाल्याच्या बातम्या उठू लागल्या. बादशहाच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी होणाऱ्या झगड्यात मराठ्यांकडून सहाय्य मिळावे आसदखाना करवी त्याचे प्रयत्न चालू झाले.

आणि अशा संधीचा फायदा घेऊनच मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उधवस्त केले. मराठ्यांचा मोठा जय झाला

(संदर्भ - सेनापती संताजी घोरपडे जयसिंगराव पवार)

Comments

  1. Avadhut Redekar23:57

    mast ahe....
    I have never read history after Chhatrapati Sambhaji Raje......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब