गुजरात लढा ४/३/१७०६

सतरावे शतक उजाडले होते तरी मराठ्यांची तरवार वावटळं घुमावी तशी घुमतच होती. दख्खन जिंकण्याचे बादशहाचे मनसुबे केव्हाचेच मातीमोल झाले होते.
स्वतःच्या(मराठ्यांच्या) घरात अजगर लोळतचं होता (औरंगजेब) पण आता त्याची फिक्र न करता. त्याचाच मुलुख मारत मराठा सरदार घुमत होते.

बादशहा अहमदनगरा स्थाईक झाल्यानंतर मराठ्यांनी सेनापती धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली गुजरातवर एक जंगी मोहीम काढली. मराठ्यांच्या विजयाने बादशहा हादरला. मार्च १७०६ मढे मराठ्यांनी भडोच, सुरत व गणदेवी परिसर लुटला. सुरतेचा काझी मराठ्यांचा कैदी बनला गुजरातचा सुभेदार शहजादा अज्जमच्या जागी काश्मीरचा सुभेदार इब्राहीम खान याची नियुक्ती झाली.

यावेळी गुजरातमध्ये हजर असणारा काफिखान म्हणतो "मोगल सैन्याचे आधिपत्य महंमद बेग खान, नजर अली खान व इल्तीफारखान यांच्याकडे होते. सोबत १०/१२ सरदार, १३/१४ हजार स्वा आणि ७/८ हजार पायदळ शिपाई होते. उभ्य पक्षात ४ मार्च ला मारामारी झाली. मराठे पळून गेले. मोगल सैन्य आराम करीत होते. याच वेळी मराठे ७/८ हजार स्वरांनिशी गाफील मोगल सैन्यावर तुटून पडले. मोगलांची दाणादाण झाली. सफदरअलीखान बाबी कैद झाला. तर नजर अली खान व इल्तीफातखान मराठ्यांच्या तावडीतून निसटले"

मराठे पळून गेले म्हणजेचं इथे झाला तो कावा आणि जिथे मराठ्यांचा कावा तिथें बाकीच्यांनी वाका दुसरा पर्यायचं नाहीये. जगाने याला गनिमी कावा म्हणून ओळखले पण आम्ही याला मानले 'शिवसूत्र'

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६