दत्ताजी शिंदे
गुरुवार १० जानेवारी १७६१ रोजी संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.
दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड
बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
याला पहिली प्रतिक्रिया माझीच आहे.
ReplyDeleteखरच फार सुंदर कामगिरी करतोस अभिषेक तू.....
आपला इतिहास आपणच जिवंत ठेवायचा आहे...
जय शिवराय
साक्षात राहुल बुलबुले यांची प्रतिक्रिया म्हणजे ब्लॉग नक्कीच चांगला झाला आसावा
ReplyDeleteपराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा
ReplyDeleteहा इतिहास माहित असला तरी पुन्हा पुन्हा वाचण्यात समाधान आहे.आपण खूप उत्तम काम करीत आहात.आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचायलाच हवा.त्या दृष्टीने हा ब्लोग एकदम उत्तम.नरवीर दत्ताजीना लाख लाख सलाम.आपण वेळोवेळी इतिहासाची आठवण करून देता हे फार चांगले आहे.असेच लिहित राहा.जय शिवराय.
ReplyDeleteDattaji Shinde yanna Shraddhanjali.... Manacha Mujara....
ReplyDeleteमराठ्यांच्या बाणेदारपणा आणि शौर्याचे साक्षात उदहारण,माझा सादर प्रणाम .
ReplyDeleteतु आहेस म्हणुन आम्ही आहोत जय शिवराय
ReplyDeleteDattaji Shinde yanna.....Manacha Mujara..!!!!!
ReplyDeleteज्या प्रमाने काहीतरी दुर्दैवी अघटित घडुन गेल्यावर जसे मन सुन्न होऊन जाते त्याच प्रमाणे हा लेख वाचुन झाल्यावर माझे मन सुन्न होऊन गेले.....धन्य ते शिवराय, धन्य त्यांचे मावळे!!!!!
ReplyDeleteShevati Marathach
ReplyDeleteJay Shivaray
This comment has been removed by the author.
ReplyDeleteare tya tivashi kafala asel to yamunecha kaat
ReplyDeletejyane pahila ha ransangram, bhitine ani sudbhavanene tychehi pani thartharle asel.
kutubshahala manav are ya senyatil 1 datta gela manun kay zale ase hajaro dattaji aamachyakade aahet, ani te sarva todis tod aahet himmat asel tar aadhav. maradhbanyachi shapat gheun sangato, dattajichya vadhacha vachapa kadhalyashivay shant basun denar nahi.ani kuthubya tu hi chant padashil ki marathi manuns manaje nemeka kay & wagh ani yachyat farak to kay?
thanks abhi for sharing this.
JAI SHIVAJI JAI BHAVANI.
बंधू तारीख बरोबर आहे पण वर्ष चुकीचे आहे
ReplyDeleteदत्ताजी शिंदे हे १० जानेवारी १७६० मध्ये पावन झाले...आणि
१४ जानेवारी १७६१ ह्या दिवशी पानिपत घडले
कृपया नोंद घ्यावी.
दत्ताजींचा जो एकेरी उल्लेख आहे तो आदरार्थी असावा...
असचं लिहित राहा. मित्रा अशीच प्रेना
ReplyDeleteदेत जा.
maharashtrat jo janmala yeto to matisathi marnyakaritach yeto
ReplyDeleteHAR HAR MAHADEV
JAY SHIVRAY
खरचं। असा इतिहास वाचल्यावर रक्त खवळुन उठतं॥
ReplyDeleteshould be 1760, not 1761
ReplyDeleteangavar kata uthato,dokyala aadya padtat,hata payat aek takat sancharte aani dolyatun aasu pdayla kartat ,,,ho kharach garv aahe mala mazya shivrayacha aani tyanchya mavlyancha,,,jay bhavani jay shivray.........
ReplyDeletemaze awadte dattaji shinde,ani tyncha itihas wachun mazi chati fugun war ali aaj dhny zalo
ReplyDeleteकायदेशीर परवानगी आणि कशी घेतात ती??? नावासह छापला तर काही हरकत आहे का??
ReplyDeleteSubdar varnan kelay...:)
ReplyDeleteHath shivshivtat talvar hata ghyala..... ajchya jagat apan karch ase kahi karu shakto ka ha sagla itihas sarvanparyant pohchvayla, ha 1ch prashna satavto. me sagyancha aadar karto je he kam chokh pane par padat ahet.
ReplyDeleteManacha mujra...har har mahadev
ReplyDeleteकौरव पांडव ...संगर तांडव ..द्वापार काली होय अति ...
ReplyDeleteतैसे मराठे ...गिलचे साचे कलीत ..लढले पानिपती ...
कौरव पांडव ...संगर तांडव
ReplyDeleteplease find on Google and enjoy poem on Panipat war
He aatach me facebook var pahile..tumhi lihilela saralsaral copy paste kelay
ReplyDeleteThank you for the post from, "Panipat", by Vishwas Patil.
ReplyDeleteजयस्तु मराठा
ReplyDelete